भैरवनाथ जय मल्हार ग्रामविकासने परिवर्तन पॅनलचा उडवला धुव्वा
अटीतटीच्या लढतीत मिळविले 13-0 यश
वाल्हे – जेऊर (ता. पुरंदर) येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी (ता. 23) अटीतटीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलने भैरवनाथ-जयमल्हार विकास परिवर्तन पॅनलचा तेरा-शून्य असा धुव्वा उडवत सोसायटी ताब्यात ठेवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले.
सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. आम्रिन बागवान यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव रामदास जाधव यांनी सहकार्य केले. दत्तात्रेय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ, जेऊरचे माजी सरपंच प्रतीक धुमाळ यांनी आभार मानले.
विजयी उमेदवार : गजानन पुरुषोत्तम देशपांडे, संजय मोतीराम गायकवाड, दत्तात्रेय तुकाराम धुमाळ, दीपक बाळकृष्ण धुमाळ, दिगंबर तानाजी धुमाळ, बाळू चिमाजी धुमाळ, मनोहर भिकोबा धुमाळ, लक्ष्मण सर्जेराव बडदरे, वंदना संतोष चोरगे, शुभांगी चंद्रकांत धुमाळ, अनिल एकनाथ गार्डी, बापूराव भिमराव गायकवाड, रत्नकांत साधू तांबे.