मंचर – येथे कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त साडेनऊ हजार भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.
यावेळी भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप संजय थोरात, सरपंच दत्ता गांजाळे, सुजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रा समितीचे कार्याध्याक्ष वसंतराव बाणखेले, नवनाथ थोरात, रंगनाथ थोरात, अरुण बाणखेले, जालिंदर जाधव यांच्यामार्फत करण्यात आले.
याप्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, अमरनाथ सेवा संघाचे सूर्यकांत धायबर, यात्रा समितीचे अध्यक्ष दत्ता थोरात, लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, प्रवीण मोरडे, बाजीराव मोरडे, स्वप्नील बेंडे, संतोष गावडे, जे. के. थोरात, मंगेश बाणखेले, जगदीश घिसे, गणेश खानदेशे, सुरेश निघोट आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आमरस पुरी, वरणभात प्रसादाचे वाटप करण्यात आले.