शेतकर्यांच्या नुकसानभरपाईसाठी ठाकरे गट आक्रमक
पॉईंटर : तहसीलदार बेडसे यांना दिले निवेदन
राजगुरूनगर – खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकर्यांना ताबडतोब नुकसानभरपाई मिळावी यासाठी खेड तहसीलदार कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 4) मोर्चा काढण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना देण्यात आले.
राजगुरूनगर येथील शिवसेना भवन ते प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण,
खेड आळंदी विधानसभा समनव्यक अमोल पवार, उपतालुका प्रमुख संजय घनवट, किरण गवारे, मंगेश पर्हाड, संरक्षण कक्षाचे प्रमुख ज्ञानेश्वर गोरडे, दत्ता भांबुरे, शहर संघटक पांडुरंग गोरे, युवा सेना समनव्यक श्रीकांत सोनवणे, युवा सेना तालुका अधिकारी मृण्मय काळे, संतोष राक्षे, अभय डांगले, सुदाम कराळे, दत्ता ढमढेरे, शहर संघटिका उमा सांडभोर, देवराम वाडेकर,
शेखर पिंगळे, स्वामी कानपिळे, काळूराम थोरवे, विलास मुंगसे, राहुल मलघे, अमोल पाचपुते, रामहरी आवटे, पांडुरंग सावंत, अनिकेत केदारी, सौरभ केंदळे, नितीन रायकर, सुनील बोंबले, अशोक मुके, स्वप्नील राक्षे, तसेच शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार नेहा शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.