टाकळी हाजी : मराठा सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांना मानधन द्यावे, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण यांनी केली आहे. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन दिले आहे.
मराठा आरक्षण सर्वेक्षण शिक्षकांनी प्रामाणिकपणे केले असून कमी कालावधीत सर्वेक्षण करताना ऊन, पाऊस, रात्र अशी तमा न बाळगता काम केले.
सर्वेक्षण वेळेत पूर्ण केले. तसेच शासनाचे वतीने १०० कुटुंबामध्ये १०००० अनुदान शिफारस केलेली असताना सर्वेक्षण झाल्यानंतर बराच कालावधी लोटला असला तरी शिक्षकांना अद्याप कोणतेही मानधन मिळाले नाही.
कामाचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी चव्हाण यांनी निवेदन देऊन केली आहे. सर्वेक्षण केल्यानंतर मानधन तरी वेळेत द्यायला हवे होते. परंतु काम करून घ्यायचे आणि परत कर्मचाऱ्यांचा विचार देखील होत नसल्याची खंत तालुकाध्यक्ष शरद धोत्रे यांनी व्यक्त केली.