मंचर-सरकारकडून करोना महामारीच्या काळात अपंग बांधवांची हेळसांड होत आहे. कठीण प्रसंगी गेल्या दोन महिन्यांची संजय गांधी योजनेची पेन्शन अपंग बांधवांना मिळालेली नाही. दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा समर्थ दिव्यांग सेवा संस्था आणि प्रहार अंपग संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे.
दिव्यांग बांधवांची परिस्थिती बिकट आहे. घरात अठरा विश्व गरीबी, बेरोजगारी काही कुटुंबात तर तीन किंवा चार असे दिव्यांग आहेत. यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून संजय गांधी निराधार पेन्शन योजना मिळते. तीदेखील दोन महिने मिळाली नाही, असा आरोप अपंग संघटनेचे नेते समीर टाव्हरे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे. तालुक्यातील तीन दिव्यांगाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात चार हजार दिव्यांग बांधव आहेत.
अंत्योदय योजनेतून नवीन जीआर नुसार दिव्यांगांना अन्नधान्य मिळत नाही. करोना महामारीत सरकारने आर्थिक आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार पेनशन योजनेची अट शिथील करून सरसकट एक हजार रुपये केली. तसा शासन निर्णय पारित केला; परंतु अद्याप ही वचरक्मम व वाढ मिळाली नाही. करोनाच्या महामारित आर्थिक दिलासा मिळावा, अशी मागणी समर्थ दिव्यांग सेवा संस्था व प्रहार अंपग संघटना यांच्या वतीने सुनिल दरेकर, मुन्ना इनामदार, मंगल धोत्रे यांनी केली आहे.