– माजी वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांचे मत
मंचर – झाडे ही ऑक्सीजन निर्मितीचे साधन असल्याने त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत राज्याचे माजी वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केले.
पारगावतर्फे खेड, ता.आबेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान वनक्षेत्रावर १५ हजार झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे माजी वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. जून महिन्यात फॉर्टिन ट्री संस्था, वेताळे या संस्थेने १५ हजार झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन होणे कामी, ४५ एकर क्षेत्रावर दोन तळी खोदण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी नवखंड विद्यालय पारगावचे सभागृहात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “सद्य परिस्थितीत झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व माजी वनसंरक्षक, रंगनाथ नाईकडे विषद यांनी केले. उपसभापती सचिन पानसरे, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, अनंत तायडे याची भाषणे झाली. कार्यक्रमास पर्यावरण जागर प्रतिषठानच्या वतीने अध्यक्ष मिलिंद शिंदे, जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील,
बाळासाहेब गवते, मधुकर खेडकर,एकनाथ वाळुंज, सरपंच नंदा पानसरे, उपसरपंच अमोल मनकर, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब सावंत पाटील, पोलीस पाटील प्रियांका कडूसकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश अभंग, नवनाथ भालेराव, प्रियांका मनकर, आरती पवार, नवखंड विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख यांनी मानले.