– नसरापूरातील बाजार पेठ मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन
कापूरहोळ – नसरापूर बाजार पेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरण व कचरा प्रकल्प हे नसरापुरचे मुख्य प्रश्न असून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. स्थानिक ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने त्यासाठी पुढाकार घेऊन साथ द्यावी, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी नसरापूर येथील कार्यक्रमात केले.
नसरापूर मुख्य बाजापेठेतून मढेघाटाकडे जाणारा राज्यमार्ग क्र. १०६ चे रुंदीकरण करणे या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपुजन नसरापूर तालुका भोर येथे दि. 23 रोजी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हे तालुका काँग्रेस अध्यक्ष नाना राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, भोरचे माजी सभापती लहुनाना शेलार, माजी उपसभापती रोहन बाठे, राजगडचे उपाध्यक्ष पोपटराव सुके, संचालक शिवाजीराव कोंडे, अशोक शेलार, अरविंद सोंडकर,बाजार समिती सभापती आनंद आंबवले,वेल्हेचे माजी सभापती दिनकर सरपाले, नसरापूरच्या सरपंच सपना झोरे, उपसरपंच सुधीर वाल्हेकर,सदस्य संदीप कदम,इरफान मुलाणी,नामदेव चव्हाण,गणेश दळवी,रोहीणी शेटे,उषा कदम,मेघा लष्कर,अश्विनी कांबळे,श्रध्दा हाडके,ग्रामसेवक विजय कुलकर्णी यशवंत कदम,ज्ञानेश्वर झोरे,अनिल शेटे,शंकर शेटे,अनिल गयावळ,सोमनाथ उकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. आ. थोपटे म्हणाले, नसरापूरमध्ये अनेक कामे झाली असून नसरापूर ग्रामस्थांच्या मागणीचा पाठपुरावा करून लवकरच ही कामे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांची कामे, बनेश्वर मंदिर रस्ता रुंद होण्यासाठी ग्रामस्थांनी जागा उपलब्ध केल्यास चांगल्या दर्जाच्या रस्त्याचे काम करण्याची जबाबदारी आमची राहील, नसरापूर बाहेरुन पर्यायी रस्ता होऊ नये, अशी येथील व्यापारयांची इच्छा आहे.
त्यासाठी या रस्त्यावरील अतिक्रमण हटणे गरजेचे आहे कोणाचीही इमारत अतिक्रमणात जात नाही काही किरकोळ अतिक्रमण आहे ते काढूऩ घ्यावे, असे अवाहन करून हा मुख्य रस्ता दहा मिटरचा होऊन दोन्ही बाजूस दीड मिटरची साईडपट्टी व एक मिटरचे गटार, असा पंधरा मिटरचा रस्ता होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.