जुन्नर – समाजाला साथ न देणाऱ्या नेत्यांना गावबंदी करणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते अमित ढोले यांनी केली. ते जुन्नर येथे उपोषणात बोलत होते.
समाजाच्या सोबत असलेल्या नेत्यांसोबत आम्ही आहोत, मात्र समाजाच्या विरोधात असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात येणार आहे. असे ढोले यांनी सांगितले. शुक्रवारी (दि.27) येथे साखळी आंदोलनाला सुरुवात झाली.
यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ दातखिळवाडी, काले, येणेरे, विठ्ठलवाडी, काटेडे आणि तांबे या सहा गावांतील बांधव उपोषणात सहभागी झाले होते. पुढील तीन दिवस गावातील युवक साखळी उपोषणात सहभागी होणार असून त्यानंतर पुढील गावे उपोषण करणार आहेत.
याचे निवेदन जुन्नर पोलीस आणि तहसील कार्यालयाला दिले आहे. यावेळी माजी सभापती बाजीराव ढोले, अमित ढोले, बाळासाहेब घोगरे, प्रदीप घोगरे, विश्वास काळे, रामभाऊ ढोले, सोपान घोगरे, जयवंत दातखिळे, मीननाथ दातखिळे, अशोक कबाडी, रवींद्र पानसरे, शशिकांत पानसरे चंद्रशेखर चिलप, प्रवेश देवकर, नरेंद्र देवकर, दत्तात्रय ढोले, विनोद देवकर, म्हातारबा ढोले, विनोद देवकर, सूर्यकांत ढोले, बाबू घोगरे उपस्थित होते.