आळंदी : आता कोठे धावे मन । तुमचे चरण देखलीया॥
प्रक्षाळपूजाच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांच्या हस्ते पवमान पूजा होऊन पहाटेचे नित्याचे विधीवत धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधीवर लिंबू पाणी सुगंधी अत्तर व इतर साहित्याचा वापर करून गरम पाण्याने अंघोळ प्रक्षाळ पूजा घालण्यात आली.
त्यामुळे माऊलींना कार्तिकी यात्रेत जो सर्व घटकांना शीण होतो, त्यांची शांती व्हावी म्हणून संतांच्या वचनांप्रमाणे प्रतिवर्षी परंपरेनुसार प्रक्षाळ पूजा करण्यात येत असते. त्यानिमित्ताने भविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर यांचे संजीवन समाधीवर अभिषेक बंद असल्याने फक्त माऊलींचे दर्शन घेतले जायचे पण माऊलींना पाणी घालावे व अभिषेक केला जावा अशी इच्छा अनेक भाविकांची असते ती ईच्छा प्रक्षाळपूजेने परिपूर्ण झाली. मंदिर समितीने योग्य नियोजन केल्याने अधिकाधिक भाविकांना व ग्रामस्थांना प्रक्षाळपूजाचा लाभ घेता आला आहे.