बारामती : विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील ऊत्कृष्ट कार्याबद्दल बारामतीचे अतुल जिनदत्त शहा यांना “महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले. मुंबईत राजभवनात पार पडलेल्या समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजात ज्या व्यक्तीनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात लक्षणीय कार्य केले आहे अशा व्यक्तीच्या कार्याचा गौरव दरवर्षी सपना सुबोध सावजी ट्स्टच्या वतीने करण्यात येतो. यामध्ये अनुप जलोटा,सचिन पिळगावकर यासारखे विशेष अथितिसोबत बारामती येथील चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक व कुसुम व जिनदत्त शाह वेल्फेअर फाउंडेशन बारामती संचालित दयोदय गोशाळेचे अध्यक्ष अतुल शहा तसेच दीप्ती पवार ह्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. यावर्षी विविध क्षेत्रातील ३५ व्यक्तीची निवड करण्यात आली होती.
अतुल शहा हे समाजोन्नतीसाठी, समाजातील गोरगरीब व गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्शील असतात. अतुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरत नियोजनबद्ध उपक्रम राबविले जातात. गोसेवा व गोमाता संरक्षण साठी ‘दयोदय” गोशाळेची स्थापना करून 250 गायीचे संरक्षण व गोसेवा व्रत घेऊन कार्यरत आहेत. कत्तल खान्यातून गायींना वाचवून जीवदान देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. तसेच मानवाला विषमुक्त अन्न मिळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करून तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत माहिती देण्याचे उपक्रम अतुल शहा राबवत आहेत.
मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी शैक्षणिक संस्थांना स्वच्छतागृह व आवश्यक ती साधनसामग्री उभा करून देण्यासाठी सहकार्य केले जाते. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते. अतुल शहा हे चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक आहेत.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अतुल शहा यांनी, पुरस्कार मिळणे म्हणजे निस्वार्थीपणे समाजातील दुर्बल, वंचित घटकांची सेवा करण्याची अधिक जबाबदारी वाढणार आहे. या पुरस्काराने सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळणार आहे. असे त्यांनी म्हणते. याप्रसंगी माजी मंत्री सुबोध सावजी, सपना सुबोध सावजी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी, संगीता अतुल शहा व अन्य मान्यवर उपस्थित होते.