पुणे – टिळक चौक (अलका टाॅकीज) शास्त्री रस्त्यावर मांगीरबाबा चौकातून डावीकडे वळण्यास जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. येथे बॅरिगेट्स लावण्यात येत आहेत. ही बंदी सायंकाळी ठराविक वेळेसाठी केली गेली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही उपाययोजना केली गेली आहे.
या परिसरात सायंकाळच्या वेळी अनेकदा जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. यामध्ये पीएमपी बस, खासगी बस आणि ट्रक-टेम्पो यांचा समावेळ असतो. एकदा का वाहतूक कोंडी झाली, की ती बराच वेळा सुटत नाही. जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मोठी कसरत करावी लागते. यामुळे सायंकाळी साडेपाच ते पावणेआठ या वेळेत येथे बॅरिकेडिंग करुन जड वाहनांना बंदी घातली जात आहे.
मात्र येथून कार, छोटे टेम्पो आणि दुचाकींना सोडले जात आहे. यामुळे नियमित होणारी वाहतूक कोंडी टळली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून हा बदल केला गेला आहे. मात्र, बदल केल्याचा फलक लावला गेला नसल्याने अनेकदा जड वाहने बॅरिकेटपाशी येऊन थांबतात. यामुळे बॅरिकेटस अगोदरच बदलाचे फलक लावावेत. जेरेकरुन जड वाहने तेथपर्यंत येणार नाहीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.