नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान सुरु आहे. यासाठी निवणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना आहे.
दरम्यान,दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून आले. प्रचारामध्ये आप आणि भाजपा आघाडीवर होते. भाजपाच्या मंत्र्यांपासून सर्वांनीच शाहीन बागचा मुद्दा प्रचारात उचलून धरला होता. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप नेते मनोज तिवारी यांनी खोचक शब्दात विधान केले आहे.
मनोज तिवारी म्हणाले,’भाजप पक्षाने दिल्ली निवडणुकीसाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहे. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाकडून शाहिनबागच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यात आले मात्र भाजपपणे विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला आहे. मतदान होताच शाहीनबागेतील सीएए विरोधातील निदर्शने बंद होणार’ अस म्हणत मनोज तिवारी यांनी आम आदमी पार्टी, काँग्रेस पक्षावर निशाणा साधला.