कोल्हापूर – 1 नोव्हेंबर हा कर्नाटक स्थापना दिवस म्हणून कर्नाटकात साजरा केला जातो. मात्र, प्रांतरचनेवेळी चुकीच्या पद्धतीने सीमाभागातील 800 हून अधिक मराठी भाषिक गावे कर्नाटकात घुसवली याच्या निषेधार्थ गेल्या अनेक वर्षांपासून सीमावासीय लढा देत आहेत.
म्हणून कर्नाटकातल्या सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या अनेक दिवसांपासून काळा दिवस म्हणून साजरा करतात., काल (सोमवार) सुद्धा सीमाभागासह कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी सुद्धा काळा दिवस पळाला. शिवाय यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध सुद्धा व्यक्त करत निदर्शने करण्यात आली.
बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातील मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. मात्र, अजूनही हा लढा कायम असून कोणत्या परिस्थितीत सीमाभागातील मराठी भाषिकांची गावे महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा पवित्रा नेहमीच घेण्यात आला आहे. दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो. त्यानुसार आज बेळगावीसह कोल्हापुरातील शिवसैनिकांकडून काळा दिवस पाळण्यात आला.
लोकशाही मार्गाने दरवर्षी मराठी भाषिक कर्नाटकात काळा दिवस पाळतात. मात्र, त्याला कर्नाटक सरकार दडपशाही करते याचाच निषेध सुद्धा यावेळी शिवसैनिकांनी मिरजकर तिकटी येथे व्यक्त केला.