नवी दिल्ली – जागतिक पातळीवर फॉस्पेटीक आणि पोटॅशीक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या खतांची आयात कमी करण्यासाठी खतनिर्मितीला देण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात केंद्रीय खत आणि रसायन मंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले की, खतांच्या अनुदान पद्धतीत बदल करून देशांतर्गत निर्माण झालेल्या खताला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. भारतामध्ये खत निर्मितीची जेवढी क्षमता आहे तिचा वापर विविध कारणामुळे केला जात नाही. या कारणांचा शोध घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
त्यामुळे देशातील खत निर्मिती पूर्ण क्षमतेने होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. मध्यंतरी जागतिक पातळीवरील किमती वाढल्यामुळे देशातील खताच्या किमती वाढल्या. नंतर केंद्र सरकारने खतावरील अनुदानात वाढ केली होती याची आठवण त्यांनी करून दिली.