मुंबई – आपल्याला गेल्या दोन दिवसांपासून फोनवर धमक्यांचे कॉल येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य प्रियांका चर्तुर्वेदी यांनी केली आहे. या प्रकरणी आपण मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. व्हीओआयपी द्वारे हे कॉल येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याद्वारे धमक्यांबरोबरच आपल्याला उद्देशून अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हे कॉल करणाऱ्यांना पोलिस शोधून काढतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रियंका चतुर्वेदी या सध्या शिवसेनेपुढे निर्माण झालेल्या पेच प्रसंगाच्या संबंधात मुंबईत आल्या आहेत. त्या उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहेत.
त्यांनी बंडखोरीच्याही विरोधात आपले जाहीर मतप्रदर्शन केले आहे. या पार्श्वभूमीवर हे कॉल बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडूनच येत आहेत किंवा कसे या विषयी त्यांनी स्पष्ट भाष्य केलेले नाही.