नवी दिल्ली – कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू ( Dheeraj sahu ) यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकून कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त केली आहे. त्यावरून राजकीय वातावरण आता तापु लागले असून भाजपने यावरून कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि या संबंधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी ( MP Priyanka Chaturvedi ) यांनी मात्र भाजपला टोमणा मारला आहे.
धीरज साहू यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडणे हा गुन्हाच आहे, पण धीरज साहू हे भाजपमध्ये आले तर त्यांना क्लीनचीट दिली जाणार नाही, अशी ग्वाही भाजपचे लोक देणार आहेत काय असा खोचक सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. ( Bjp dheeraj sahu )
त्यांनी म्हटले आहे की ज्या अजित पवारांवर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप भाजपनेच केला होता. तेच आता त्यांच्या महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री झाले आहेत. भाजपबरोबर गेलेल्यांवरील ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई लगेच थांबवली जाते आणि त्यांचे शुद्धीकरण होते. ( dheeraj sahu raid )
कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये आल्यावर त्यांना लगेच कसे शुद्ध घोषित केले जाते, हे भाजपने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.