मुंबई – महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांनी गृहमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर कोणत्या ना कोणत्या कारणावरून गुंड आणि गोळीबार प्रकरण सुरु असल्याचे पाहायला मिळाले. शहा यांना लिहिलेल्या पत्रात चतुर्वेदी यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा आणि या महिन्याच्या सुरुवातीला शेजारच्या ठाणे जिल्ह्यात एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
“मी तुम्हाला विनंती करते की महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीत तेथील रहिवाशांचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्यापूर्वी तातडीने हस्तक्षेप करा” अशी मागणी या पत्राद्वारे चतुर्वेदी यांनी केली आहे.
Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP @priyankac19 writes union home minister asking to intervene & step in to stop the further deteriorating d law & order situation in Maharashtra. She also list out the series of incidents that illustrates how the law & order has broken down in state. pic.twitter.com/fG64ViSPcu
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) February 9, 2024
व्यापार आणि व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई हे शहर आता वाढत्या गुन्हेगारी, हिंसाचार आणि गोळीबाराने विस्कळीत झाले आहे. निरपराध नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी बंदुकांच्या सर्रास वापरामुळे राज्य सतत भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे असे देखील चतुर्वेदी यांनी यावेळी नमूद केले आहे.