नवी दिल्ली – गलवान खोऱ्यातील चीन व भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत काल भारताचे आणखी १७ जवान शाहिद झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भाष्य करताना, ‘भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही भारताला शांतता हवी आहे, याबाबत शंका नाही मात्र पण आम्हाला डिवचल्यास आम्ही चोख प्रतिउत्तर द्यायला सक्षम आहोत.’ असं वक्तव्य केलं. अनलॉक-१ च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“भारतीय जवानांनी आपल्या वेळोवेळी आपल्या शौर्याचं दर्शन घडवलंय. आपल्यातील क्षमता सिद्ध केल्या आहेत. विक्रम आणि शौर्य हे आपल्या भारत देशाच्या चारित्र्याचा भाग आहे. मी देशवासियांना विश्वास देतो की, भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपणं आपल्यासाठी सर्वोच्च असल्याने त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. भारताला शांतता हवीये याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. मात्र आम्हाला डिवचल्यास योग्य वेळी भारत प्रतिउत्तर देण्यास सक्षम आहे.” असं ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात लढताना शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या जागेवर उभं राहण्याचं आवाहन केलं.
#WATCH India wants peace but when instigated, India is capable of giving a befitting reply, be it any kind of situation: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/rJc0STCwBM
— ANI (@ANI) June 17, 2020