पाण्याच्या योजनेच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी..
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याची योजना मंजूर असून देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास दिरंगाई होत असल्याने वाघोली ग्रामस्थांच्यावतीने पीएमआरडीए कार्यालयावर आंदोलन करून पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी पीएमआरडीए चे आयुक्त यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
वाघोली हे गाव पुणे महानगरपालिके शेजारील अतिशय वेगाने नागरीकरण होणारे गाव असून गावाची लोकसंख्या सध्या अंदाजे दोन ते अडीच लाख दरम्यान आहे .एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मुख्य गावठाण ,वाड्या ,वस्त्या , नवीन प्लॉटिंग मुळे विकसित होत असलेले भाग ,सोसायटी रहिवाशी ,भविष्यात गावात विकास होणारे परिसर या सर्व ठिकाणी मुख्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत आहे.त्यामुळे या कार्यकारी मंडळाने सण 2018 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांचेकडे वारंवार पाठपुरवठा करून वाढीव नळ पाणीपुरवठा योजना (22 कोटी रुपये )वढू डॅम ची मंजूर करून घेतली होती.
सदर कामाचे कार्यरंभ (work order)आदेश दिनांक 19/09/2019 रोजी देण्यात आले होते.वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ आदेश देऊन आज ते 7 ते 8 महिने होऊन गेले. परंतु सदर योजनेचे कामकाज वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकरे सुरू झाले नाही.त्या मुळे दि.:17/06/2020 रोजी सकाळी 12 वाजता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) औंध ऑफिस वर वाघोली गावातील सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर राखून आंदोलन करण्यात आले.
“वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाठबळावर सतत पाठपुरावा करून देखील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यापुढील काळात ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने सहकार्य केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संदीप सातव ,माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली.
यावेळी प्रॉब्लेम सॉल्वर चे सर्व सदस्य वाघोलीतील सर्व नागरिक उपस्थित होते .यावेळी पीएमआरडीए चे आयुक्त विक्रम कुमार व नियोजनकार गीतेकर यांचाशी वाघोलीतील सर्व समस्या विषयी चर्चा करून त्यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरात लवकर सदर योजनेचे काम चालू होईल असे आश्वासन दिले आयुक्तांनी दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.