नवी दिल्ली : जगासह देशावर करोनाचे संकट भयाण झाले आहे. करोनामुळे देशातील सर्वच क्षेत्रावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष बैठक घेतली.
पंतप्रधानांनी घेतलेल्या या बैठकीत संरक्षण क्षेत्र आणि एअरोस्पेसमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यावर चर्ता करण्यात आली. तसंच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करोनाच्या संकटकाळादरम्यान देशातील संरक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आर्म्ड फोर्सेसच्या छोट्या आणि मोठ्या कालावधीतील गरजा पूर्ण करणे आणि स्वावलंबी वनवण्यावर बैठकीत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. तसेच ऑर्डिनंन्स फॅक्टरीमधील सुधारणा, खरेदी प्रक्रियेचे सुलभीकरण, याव्यतिरिक्त संशोधन आणि विकासाला चालणा देणे, संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकदारांना आकर्षित करणं आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढवणं यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्र आणि एअरोस्पेस क्षेत्रात भारतात अधिक सक्षम बनवण्यावर अधिक भर दिला. तसंत संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील सुधारणांवरही भर देण्याच्या सुचना यावेळी केल्या. तसेच या बैठकीत संरक्षण क्षेत्रात होणाऱ्या खर्चांमध्ये कपात करण्याच्याही सुचनाही पंतप्रधानांनी केल्या. याचा वापर आवश्यक त्या संरक्षण सामग्रींच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो, असेही यावेळी सांगण्यात आले.
याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रात मेक इंन इंडियाला चालाना देणं आणि स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञानासोबत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावरही भर दिला. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्य मत्री अनुराग ठाकूर आणि सरकारमधील अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते.