नवी दिल्ली – यावर्षी भारताचा विकास दर कमी होऊन सात टक्के होणार आहे. तो शक्य तितक्या लवकर वाढावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या कार्यालयात अर्थतज्ञ आणि इतरांची शुक्रवारी चर्चा करणार आहेत.
या बैठकीला विविध क्षेत्रातील तज्ञाबरोबरच बरेच केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून त्यांनी अगोदरच विविध क्षेत्रातील व्यक्तीबरोबर या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे.
भारतातून मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर मंदीमुळे जागतिक बाजारातून मागणी कमी आहे. त्यामुळे यावर्षी विकास दर कमी होऊन सात टक्के होणार असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने गेल्या आठवड्यात सांगितले आहे.
त्यामुळे सौदी अरेबिया जगातील सर्वात जास्त विकासदर असणारा देश ठरणार आहे. गेल्या वर्षी भारताचा विकासदर 8.7 टक्के होता. सांख्यिकी विभागाबरोबर रिझर्व्ह बॅंक आणि तर पतमानांकन संस्थांनी यावर्षी भारताचा विकासदर कमी होणार असल्याचे सांगितले आहे.