हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकुमशाहीची प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असून त्यातून देशालाच धोका निर्माण झाला आहे असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केला आहे.
मोदींनी देशाला केवळ फसवण्याचेच काम केले आहे असा आरोप करून त्यांनी म्हटले आहे की निवडून येण्यापुर्वी त्यांनी देशाला जी जी आश्वासने दिली त्यातील किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली याचा हिशेब त्यांनी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
टीआरएस पक्षाने आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना राव म्हणाले, “तुम्ही (मोदी) लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेची दररोज हत्या करत आहात, तुमचे ऐकत नाही अशा सरकारला तुम्ही खाली खेचत आहात आणि तुमचे न ऐकणाऱ्यांचा आवाज दाबून टाकत आहात.
महाराष्ट्र हादरला! अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या
या देशात कोणीही सत्तेचा कायमचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, एकदिवस तुम्हालाही सत्तेवरून पाय उतार व्हावे लागेल याची जाणिव ठेवा असा इशाराहीं राव यांनी मोदींना दिला आहे. आज मोदी भाजप राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीसाठी हैदराबादलाच आले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी हा हल्लाबोल केला.
जेव्हा (मोदी) निवडून आले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते पण त्याऐवजी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली, असे राव म्हणाले. राष्टपतीपदाचे विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा हेही यावेळी उपस्थित होंते. त्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले की या निवडणुकीतील मतदारांनी दोन्ही उमेदवारांची तुलना करून मतदान करावे.
उदयपुर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याच्या दाव्याने एकच खळबळ