पुणे – पावसामुळे एकीकडे पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. दुसरीकडे मात्र पावसामुळेच फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांच्या भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आले, लसूण, टोमॅटोचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
पावसामुळे भाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे भाव किरकोळ बाजारात चढे आहेत. पावसामुळे घाऊक बाजारात होणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात बहुतांश भाज्यांचे एक किलोचे भाव 80 ते 120 रुपये दरम्यान आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख आडते विलास भुजबळ यांनी दिली. “भाज्यांचे दर चढे असल्याने मागणी कमी झाली आहे. नवीन लागवड केलेल्या भाज्यांची आवक सुरू होण्यास आणखी महिनाभर लागणार आहे. त्यानंतर भाज्यांचे भाव आवाक्यात येतील.’
किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
आले- 220 ते 260 रु.
लसूण- 240 ते 300 रु.
टोमॅटो- 160 ते 200 रु.
मटार- 300 ते 350 रु.
वांगी- 80 ते 100 रु.
फ्लॉवर- 80 ते 100 रु.
कोबी- 50 ते 60 रु.
कांदा- 30 ते 35 रु.
बटाटा 30 ते 35 रु.
पांढरा घेवडा 100 ते 120 रु.
पावटा – 80 ते 100 रु.