“प्रभात’च्या दणक्याने “आकडा’ काढला : पथक रिकाम्या हाताने परतले
मोरगाव -“सरकारी कार्यालयेच गुंतलीत वीजचोरीत’ या मतथळ्याखाली दैनिक “प्रभात’मध्ये बुधवारी (दि. 25) वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित सरकारी कार्यालये आणि महावितरण खडबडून जागे झाले आणि त्यांनी वीजचोरीसाठी विद्युत खांबावर टाकलेला “आकडा’ तात्काळ काढून टाकल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
लोणी भापकर येथे दिवसा ढवळ्या वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला धक्कादायक प्रकार “प्रभात’ने बुधवारी (दि. 25) चव्हाट्यावर आणल्याबरोबरच लोणी भापकर येथील संबिधित कार्यालयातील अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसवेतच महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांची बुधवारी सकाळपासून एकच धावाधाव झाली.
तर गुरुवारी (दि. 26) सकाळी नागरिकांचे संबंधित विद्युत खांबाकडे लक्ष गेले तर या खांबवरूर टाकलेला “आकडा’ गायब झाल्याने सगळ्यांना सुखद धक्का बसला, “प्रभात’च्या दणक्याने संबंधित खात्यासह महावितरण खाते खडबडून जागे झाल्याने नागरिकांनी “प्रभात’वर कौतुकाचा वर्षाव केला.
विशेष पथकाची निराशा
“प्रभात’च्या बातमीची दखल घेत स्थानिक महावितरणचे विशेष पथकाने कारवाईसाठी या कार्यालयात भेट दिली; मात्र तोपर्यंत टाकलेला “आकडा’ काढण्यात आला होता, त्यामुळे विशेस पथकाला कारवाई विना परतावे लागले. मात्र, चोरी करणाऱ्यांवर “प्रभात’चा डोळा असल्याने या भागातील वीजचोरांनी चांगलाच धसका घेतला असल्याची चर्चा परिसरात सध्या रंगली आहे.