मुंबई: आज संध्याकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी महाविकासआघाडीची किमान-समान कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषद सुरु आहे.
- धर्माच्या नावावर भेदभाव करणार नाही
- शेतकरी व सर्वसामान्यांच सरकार आहे
- शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेऊन सरकार निर्णय घेणार
- कर्जमाफी, नोकरभरती संदर्भात घोषणा
- १० रुपयात जेवण देणार
- महाराष्ट्रात सर्व धर्म समभाव समजावून सांगू
- शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याचे आश्वासन
- महिला सुरक्षा हि सर्वात मोठी प्राथमिकता असेल
- आर्थिक दृष्ट्या मागास मुलींना मोफत शिक्षण देणार
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचे भत्ते वाढविणार
- महिला बचत गटांना आणखी मजबूत करण्यात येईल
- शेतमालास योग्य भाव देण्यासाठी उपाययोजना आखणार