कोलकाता : प. बंगालमध्ये विधानसभेसाठी झालेल्या तीन जागांच्या पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाला धुळ चारत तृणमूल कॉंग्रेसने सर्व जागांवर विजय संपादित केला. भारतीय जनता पक्षाच्या दादागिरीला नाकारणाऱ्या जनतेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूलने व्यक्त केली आहे.
हा जनतेचा विजय आहे. हा विकासाचा विजय आहे. दादागिरीचे राजकारण चालले नाही. लोकांनी भाजपाला नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. तृणमूलने राज्याच्या उत्तरेकडील कालियाजंग मतदारसंघात तृणमूलने विजय मिळवला. राज्याच्या पश्चिमेकडील खरगपूर सदर आणि प. मिदनापूर जिल्ह्यातील करीमपूर येथे 24 हजारांहून अधिक मताधिक्याने सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला. या दोन्ही जागा तृणमूलने प्रथमच जिंकल्या आहेत.
तृणमूलचे तपन देवसिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमलचंद्र सरकार यांचा दोन हजार 304 मतांनी पराभव केला. खरगपूर सदर येथे आमदार दिलीप घोष हे लोकसभेवर निवडून गेल्याने तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने 42 पैकी 18 जिंकल्या होत्या. त्यानंतर या पहिल्यादाच झालेल्या पोटनिवडणुका आहेत. मतदानादानाच्या दिवशी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि उमेदवार जय प्रकाश मुजुमदार यांना लाथाबुक्क्यांनू मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकांकडे देशाचे लक्ष वेधले गेले.