prakash ambedkar । काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. यानंतर मविआकडून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्षाला योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार वंचितच्या काही नेत्यांनी केली. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनीही मविआच्या नेत्यांनावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,’महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झालेलं नाही.’ असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
अशात आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेमका किती जागांवरून वाद सुरु आहे हे स्पष्टच सांगितले आहे. भंडारा येथे माध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले,’महाविकास आघाडीत आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात १५ जागांसाठी भांडणे सुरू आहेत. त्यांचा जागावाटपाचा तिढा सुटला, की आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठी जागांची मागणी करू.. आम्ही अजूनही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केल यावर शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
‘चांगली गोष्ट आहे आंबेडकर यांनी लेखी मागितला असेल तर ते त्यांना दिले जाईल प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर आहे ही चांगली गोष्ट आहे. वंचित ज्या सीट मागील त्या सीट त्यांना द्यायला काही हरकत नाही आणि लिहून द्यायला काय हरकत नाही. सत्ताही प्रश्न सोडवण्यासाठी आहे. लोकांच्या हिताचा निर्णय असेल.’
हेही वाचा
Prakash Ambedkar। महाविकास आघाडीत नेमका किती जागांवरून वाद? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं गणित