Prakash Ambedkar । लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून बैठकींचे सत्र सुरु आहे. अशात महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजूनही फायनल यादी तयार झालेली नाही. अशात काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. यानंतर मविआकडून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्षाला योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार वंचितच्या काही नेत्यांनी केली.
तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनीही मविआच्या नेत्यांनावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,’महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झालेलं नाही. चारही पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी संघर्ष सुरु आहे. जागावाटपासाठी नुसत्या चर्चा चालू असून मविआ नेते अद्याप त्यातून कुठलाही निष्कर्ष काढू शकले नाही.’ असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे अशात आता भाजपाही प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करते आहे.
अशात आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेमका किती जागांवरून वाद सुरु आहे हे स्पष्टच सांगितले आहे. भंडारा येथे माध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले,’महाविकास आघाडीत आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात १५ जागांसाठी भांडणे सुरू आहेत. त्यांचा जागावाटपाचा तिढा सुटला, की आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठी जागांची मागणी करू.. आम्ही अजूनही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा
Nitin Gadkari। गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले काय? या नेत्याने सगळंच काढलं …