सासवड, (प्रतिनिधी)- पंचायत राजमुळे महाराष्ट्र राज्यात अनेक नेते झाले आहेत. सुधाकर नाईक, विलासराव देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. ते पुढे मुख्यमंत्री झाले. शून्यातून आलेली लोक अनेक यशस्वी झाले. ते फक्त पंचायतराजमुळे अनेक युवकांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सत्ता आल्यानंतर सत्ता जमिनीवर पाय ठेऊन असावी.
ती डोक्यात गेली नाही पाहिजे, असे प्रतिपादन माजी केद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले खळद (ता. पुरंदर) येथील माऊली गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, पुरंदर तालुक्यातील अडचणी अधिक आहेत. परंतु लोक कष्टाळू आहेत. आजपर्यंत पुरंदर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लोकांसाठी कामे केली आहेत. पुरंदर तालुक्यात अनेक लोकांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी संधी मिळाली. माझ्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या शिष्टमंडळ इस्राईल गेले होते. त्यात 2 मुख्यमंत्री गेले होते. त्यातील एक पंतप्रधान आहेत.
गेल्या पंधरा वर्षापासून मी निवडणुका लढवत असून यामध्ये अनेकांनी मला मदत केली आहे. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकत नाही. राज्यातील सत्ताधारी आमदारांना विधानसभेमध्ये मारामारी करावी लागते, हे आपकी बार गोळीबार सरकार, असा उल्लेख आता करावा लागेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
यावेळी सुरेश भोर, जालिंदर कामठे, विजय कोलते, माणिकराव झेंडे पाटील, विलास लवांडे, दशरथ माने, संभाजी झेंडे यांनी मनोगते व्यक्त केली. आमदार संजय जगताप म्हणाले की, पुरंदर तालुक्यासाठी ७ चारा डेपो मंजूर झाले आहेत. पवार साहेबांच्या विचारधारेशी बांधील असून 1972 पासून सुदाम आप्पा व आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ज्या ठिकाणी सुदाम आप्पा आहेत त्या ठिकाणी विजय हा निश्चित असतो. राज्यामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही हे समजत नाही.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार बापू पठारे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सचिन घुले निवृत्ती बांदल, माणिकराव गोते, दशरथ माने, शामकांत भिंताडे, दिलीप बारभाई, भरत झांबरे, गंगाराम जगदाळे, अमोल कामठे, सुरेश गोते, बाळासाहेब भिंताडे, मधुकर मेह्त्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब पवार, माणिक झेंडे पाटील, बळवंत गरुड, शिवाजी शेंडकर, सारिका इंगळे, हरिभाऊ लोळे, शरद जगताप, अनिल जगताप, प्रदीप कदम, राजेंद्र झेंडे, राहुल थोपटे, कैलास कामठे, राजू पोमण, सुनील कुंजीर, हनुमान टेकवडे, कैलास इंगळे, नामदेव कुंभारकर, दीपक निगडे, रत्नाकांत काकडे, संतोष निगडे, शैलेश खैरे, महेंद्र इंगळे, अनिल इंगळे, अशोक कुंभार, संभाजी गायकवाड, राजू जगताप, महेश इंगळे, रणजित इंगळे यांनी केले.
ला.ख