गडचिरोली – महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला असून, हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहे. दरम्यान, कालच्या हल्ल्यानंतर आज नक्षलवाद्यांनी सरकारला थेट धमकीदिल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली परिसरात रस्ते आणि पूल बांधू नका, असे बॅनर लावण्यात आले आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
Maharashtra: Naxal banners spotted near the site of Gadchiroli naxal attack, in which 15 security personnel and 1 driver lost their lives yesterday. pic.twitter.com/eqcHIFZRs9
— ANI (@ANI) May 2, 2019