पुणे- राजगुरूनगर शहरात कर्फ्यू लावण्यात आला असून नागरिक काळजी व उपाययोजना अमलात आणत नसल्याने पोलिसांकडूनच आता प्रभावी उपाययोजना राबवली जात आहे. दरम्यान शासनाने कलम 144 व आज संचारबंदी लावली तरीही अनेक नागरिक असतानाही सकाळीपासून किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. ती पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे दुपारी कमी झाली.
करोना विषाणूंचा धोका वाढत असताना आणि शासनाने निर्बंध घातले असताना नागरिक मात्र बेफिकीर राहून रस्त्यावर येत आहेत. भाजी पाला, किराणा व दूध सह जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करीत असल्याने करोनाचे संकट कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राजगुरूनगर शहरातील काही किराणा दुकानदार याबाबत निष्काळजीपणा दाखवत आहेत.माल विकताना रांगा न लावता अनेकांची गर्दी दुकानात पाहायला मिळाली.शहरातील होलसेल दुकानात विशेषतः मोठी गर्दी झाली होती.सलग दोन दिवसांच्या बंद मुळे ही गर्दी उसळली होती.
प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी उपाययोजना केली जात असताना नागरिकांना आवर घालणे कठीण झाले आहे. राजगुरुनगर शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असुन तरीही छोट्या मोठ्या बाजूने नागरिक शहरात येत आहेत. यात बघ्यांची संख्या मोठी असून पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शहरात बाहेरील नागरिक दुचाकीवरून येत असून गर्दी करीत आहेत.