रायगड – देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकणात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आणि राज्य सरकारने भरघोस मदत करावी ही मागणी केली. तसेच गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत. मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही, अशी देखील टीका राज्य सरकारवर केली.
प्रारंभी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत आज देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्यांसह नुकसान पाहणी दौर्याचा प्रारंभ केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी उपस्थित होते.
तसेच अलिबाग बंदर येथे भेट देऊन फडणवीस यांनी मासेमार बांधवांशी संवाद साधला. बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.