नवी दिल्ली – संसदेच्या (Parliament) जुन्या इमारतीला एक आभा होता आणि संवाद साधणे सोपे होते. मध्यवर्ती हॉल आणि कॉरिडॉरमध्ये एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये जाणे सोपे होते. नव्या संसदेत (Parliament) सभागृह चालवण्यासाठी दोन्ही सभागृहांमधील बंध कमकुवत झाला आहे.
जुन्या इमारतीत मोकळेपणा जाणवत होता, तर नवीन इमारतीत बंदिस्त जागेमुळे श्वास घुसमटल्याची अथवा जीव गुदमरल्याची भावना होत आहे, असे प्रतिपादन, कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केले आहे.
रमेश म्हणाले की, जुन्या इमारतीमध्ये वाट चुकलो तर गोलाकार असल्यामुळे मार्ग सापडत होता पण नवीन बिल्डींग मध्ये वाट चुकलो तर चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटते आहे. त्यामुळे नव्या इमारतीला “मोदी मल्टिप्लेक्स’ म्हणा किंवा “मोदी मॅरियट म्हणा’, ते संसद भवन अथवा लोकशाहीचे मंदिर वाटत नाही.
नवीन संसद भवन पूर्ण उत्साहात सुरू करण्यात आले. यामुळे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. चार दिवसांनंतर, मला वाटते की संसदेच्या नवीन इमारतीतील आणि लॉबीमधील संवाद संपला आहे.
जर वास्तूच लोकशाहीला मारून टाकू शकते तर पंतप्रधानांनी संविधानाचे पुनर्लेखन न करता लोकशाही संपवण्यात यश मिळवले आहे, असेही रमेश सांगत आहेत.जयराम रमेश यांनी लिहिले की हॉल अजिबात सोयीस्कर नसल्यामुळे एकमेकांना पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असेल.
मी ऐकले की, सचिवालयाचे कर्मचारीही नवीन डिझाइनवर खूश नाहीत. इमारतीच्या वापरकर्त्यांशी सल्लामसलत नसल्यामुळे हे घडले आहे, याकडे लक्ष वेधून समेश म्हणाले की, संसद भवनात येण्याचा आनंद मावळला आहे.
मला खात्री आहे की पक्षातील अनेक सहकाऱ्यांना असेच वाटत असेल. कदाचित 2024 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नवीन संसद भवनाचा अधिक चांगला उपयोग होईल.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी जयराम रमेश यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नवी संसद आता एक वास्तव आहे. जयराम रमेश यांनी जुन्या संसदेत जाणार असे न म्हटलेले नाही. म्हणजे आगामी काळात ते नवीन संसद इमारत बांधणार, असे म्हणत आहेत का?