मुंबई – मुसळधार पावसाने नागपुर (Nagpur Rain) शहरात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहराचा (Nagpur Rain) बराच भाग जलमय झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी असंख्य नागरीक अडकून पडले होते. त्यातील 180 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नागपुरातील (Nagapur news) सध्याच्या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतची माहिती देताना यामध्ये एका आजीचा मृत्यू झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
“नागपूरमध्ये जवळपास ४ तासांमध्ये १०९ मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. त्यातील ९० मिलीलीटर पाऊस केवळ दोन तासात झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रचंड तीव्रता पाहायला मिळाली. यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर झाल्याची स्थिती निर्माण झाली” अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (nagpur rain update)
“शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. पाहणी करून पंचनामे करणं, तात्पुरती मदत असं काम सुरू आहे. याशिवाय एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांना आमचं एकच आवाहन असणार आहे की, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे कुठलीही अडचण असेल तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा” असं देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
शुक्रवारी रात्रीपासूनच नागपुरात मुसळधार पाऊस (Nagpur Rain) पडत आहे. रात्रीपासून सकाळी साडे पाच वाजेपर्यंत विमानतळ परिसरात 106 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.अग्निशमन विभागही बचाव कार्य करत आहे. नागपूर महानगरपालिकेने (nagpur corporation) लोकांना अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.