इस्लामाबाद : फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना नागरी न्यायलयात दाद मागता यावी म्हणून पाकिस्तान त्यांच्या लष्करी कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती संरक्षण खात्यातील सुत्रांनी बुधवारी येथे दिली.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या जाधव यांना घुसखोरी आणि दहशतवादाच्या प्रयत्नाखाली एप्रिल 2017मध्ये फाशी ठोठावण्यात आली होती. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या व्यायसायिक कामासाठी इराणला गेलेल्या जाधव यांचे तेथून अपहरण करण्यात आले, असे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायलयाने 17 जुलै रोजी दिलेल्या निर्णयानुसार नागरी न्यायलयात कुलदीप यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खटला चालवण्यासाठी लष्करी कायद्यात सुधारणांचे विधेयक तयार करण्यात आले.