हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर सडकून टीका केली आहे. भागवत यांनी ज्ञानवापी वादावर केलेल्या वक्तव्यावरून ओवेसींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,”विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी अयोध्या संघाच्या अजेंड्यावरही नव्हती, असे मोठे विधानही ओवेसींनी यावेळी केले आहे.
“भागवत यांच्या ज्ञानवापीवरील भाषणाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. बाबरी मशिदीसाठीचे आंदोलन लक्षात ठेवा जे ऐतिहासिक कारणांसाठी आवश्यक होते. त्यावेळी आरएसएसने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आनादर केला. आणि त्यात भाग घेतला. निकालापूर्वी मशीद पाडली. याचा अर्थ ते ज्ञानवापीवरही तेच करतील का?” अशी शंका यावेळी त्यांनी उपस्थित केली.
1. Bhagwat’s incendiary speech on #Gyanvapi mustn’t be ignored. He said an agitation for #Babri was necessary “for historical reasons”. In other words, RSS didn’t respect SC & participated in demolition of masjid. Does this mean that they’ll do something similar on Gyanvapi also? pic.twitter.com/9lk4lAUI7A
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 3, 2022
ओवेसी यांनी देशात शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी भाजप प्रमुख जेपी नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सल्ल्याबद्दलही प्रश्न केला. ते म्हणाले, “या मुद्द्यांवर सल्ला देणारे मोहन किंवा नड्डा कोण आहेत? त्यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नाही. या मुद्द्यावर आणि प्रार्थनास्थळ कायदा, 1991 संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे स्पष्ट संदेश यायला हवा. त्यांनी राज्यघटनेची शपथ घेतली असून अशा परिस्थितीत त्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहिल्यास हे प्रश्न सुटतील.”
ते म्हणाले, “विश्व हिंदू परिषद स्थापन होण्यापूर्वी, अयोध्या मंदिर संघाच्या अजेंड्यावरही नव्हते. १९८९ मध्येच भाजपच्या पालनपूरच्या ठरावाने अयोध्याची स्थापना झाली आहे. अजेंड्याचा भाग आहे. असे करून आरएसएसने आपला राजकीय दुटप्पीपणा सिद्ध केला आहे. काशी, मथुरा, कुतुबमिनार इत्यादी मुद्दे उपस्थित करणाऱ्या सर्वांचा संघाशी थेट संबंध आहे.” ओवेसी म्हणाले, “बाबरी मशीद आंदोलनादरम्यानही काही लोक म्हणाले की, ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू, तर काहींनी सांगितले की हा विश्वासाचा मुद्दा आहे आणि न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. हे लोक कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे. “असे त्यांनी यावेळी म्हटले.
ज्ञानवापी मशिदीचा इतिहास आहे जो कोणीही बदलू शकत नाही, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, मशिदींमध्ये शिवलिंग शोधण्याची गरज नाही. यामुळे विनाकारण वाद वाढतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच संघाला रामजन्मभूमी आंदोलनानंतर दुसरे कोणतेही आंदोलन सुरू करण्यात रस नसल्याचेही भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले होते.