आळंदी -तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच पालखी प्रस्थान सोहळा भरत असल्याने सोहळा अनुभवण्यासाठी गेली तीन दिवसांपासून लाखो भाविक अलंकापुरी नगरीमध्ये येऊन दाखल झाले होते. त्यामुळे सोहळ्याचा उत्साह देखील शिगेला पोहोचला दिसत होता. सुमोर तीन लाखांहून अधिक भाविक या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
गेली तीन दिवसांपासून अलंकापुरी नगरीमध्ये ठिकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमात वारकरी दंग झाले होते. आज (मंगळवारी) माऊलींचा प्रस्थान सोहळा असल्याने अवघी अलंकापुरी नगरीच हरिनाम गजरात दंग झाली होती. पहाटे इंद्रायणीतीरी पवित्र अभ्यंग्य स्नान करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. येथील युवा कार्यकर्ते राहुल चव्हाण व मित्र परिवार यांचे वतीने येथील भैरवनाथ मंदिरात वारकरी भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले. तसेच वारकरी भाविक भक्तांना ठिक ठिकाणी अन्नदान चहापानव इतर खाद्य पदार्थांचे स्वंयसेवी संस्थांकडून हे उपक्रम आज दिवसभर सुरू होते.
पहाटेपासून नगरप्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी माऊली माऊलीचा नामजजघोष करीत राज्य परिसरातून विविध भागातून आलेल्या विविध समाजातील वारकर्यांनी आपली नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. दुपारी एक वाजता मंदिर स्वच्छतेसाठी बंद करण्यात आले, याकामी स्वकाम सेवा मंडळ इतर स्वयंसेवी संस्थांकडून तसेच इतर अनेक माध्यमांतून मंदिर स्वच्छ झाले नंतर प्रमुख प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण होताच,
प्रथम दुपारी ठिक अडीच वाजता मानाची पहिली 26ची रथापुढील दिंडीने मंदिरात प्रवेश केला व प्रस्थान सोहळ्यास आरंभ झाला. अशा एकूण रथापुढील 26 व रथामागील 21 मिळून 47 दिंड्या एकापाठोपाठ एक असे करीत सर्व दिंड्यांनी मंदिरात प्रवेश केला. तद्नंतर माऊलींच्या अश्वांचे आगमन झाले. यावेळी मात्र माऊली मंदिरात एकच नाद घुमू लागला. तो म्हणजे माऊली माऊलीचा नामजजघोषाने अवघा देऊळवाडाच पंढरीच्या विठू भेटीची वाट पाहू लागला.