नागपूर – कर्नाटक सीमावादावरुन विरोधकांची श्रेयवादाची लढाई सुरु आहे, असा आरोप भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवारी विधानपरिषदेत केला.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्र शासीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, छगन भुजबळ यांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार आहे. कारण ते सीमावादाच्या लढ्यात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी 40 दिवस कारागृहात होते. त्यांना तर या विषयी बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे.
जे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कधी ज्यांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खल्ल्या नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर संशय घेणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगाविला.