Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर जहरी टीका केली. राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं. या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले.
हेही वाचा
SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, “आता मी सर्व…”
भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी थेट मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.
प्रवीण दरेकर विधानपरिषदेत म्हणाले,’राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा’ असेही ते म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले,’राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी.’ असेही प्रवीण दरेकर यांनी म्हणाले आहे.
हेही वाचा
महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव म्हणाले,’श्रीकांत शिंदे माझ्या कपाळावरुन…’