मुंबई – भाजपचे आमदार अधिक असूनही सध्या राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Cm eknath shinde) आहेत. अशात शरद पवारांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) देखील सत्तेत सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले. राज्यात पुन्हा तीन पक्षांचे सरकार आल्याने प्रत्येक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पुढील मुख्यमंत्री आमचाच होणार असे म्हणत असताना आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रात नेतृत्व करावे असे खळबळजनक विधान केले आहे.शिरसाट यांच्या या विधानानंतर आता भाजपने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केंद्रात नेतृत्व करावं असं म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. दरेकर म्हणाले, “फडणवीसांनी दिल्लीला जावे कि महाराष्ट्रात रहावे हे सुचवण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही.त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, मी औकातीत हा शब्द वापरात नाही कारण शिरसाट हे आमच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत असा टोला देखील यावेळी दरेकरांनी लगावला. तसेच आमचे दिल्लीचे नेतृत्व सक्षम आहे फडणवीसांनी राज्यात राहायचं कि केंद्रात हे ते ठरवतील असंही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बावनकुळे यांनी देखील व्यक्त केलं मत
भाजप कार्यकर्त्याला वाटत फडणवीसांनी मुख्यामंत्री व्हावं परंतु दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल ठेच होईल.दिल्लीने ठरवले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आम्हाला काम करावं लागेल परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजप कार्यकर्त्याची इच्छा असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय म्हणाले संजय शिरसाट नेमकं ?
“तीनही पक्षातील अनेक कार्यकर्ते आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बॅनर लावतात. परंतु एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहेत म्हणून त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे” अशी इच्छा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी हे विधान केले.