पुणे – ऑपरेशन गंगाद्वारे भारत युक्रेनमधून नागरिकांना भारत बाहेर काढतो आहे. हा भारताचा वाढता प्रभाव आहे. हजारो तरुणांना परत आणलं. पण अनेक देशांना ते शक्य झालं नाही. डिफेन्सिव्ह आणि डिफेंडंड सायकोलॉजीला तोंड द्यावं लागत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
सिम्बॉयोसिस विद्यापीठातील आरोग्यधामचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भारत अनेक क्षेत्रात ग्लोबल लीडर होण्याच्या मार्गावर. इलेक्ट्रॉनिक, संरक्षण क्षेत्रात अफाट आयात होत होती. आता परिस्थिती बदलली. मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी. दोनशे पेक्षा जास्त उत्पादन केंद्र. संरक्षण साहित्याची आता निर्यात करीत आहे. त्यामुळे तरुणांना अधिक संधी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा करून घ्या, असेही मोदी म्हणाले.
७५व्या वर्षात नव्या उद्दिष्टे, नेतृत्त्व तरुणांकडे, एआय ते ईव्हीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी. अनेक सुधारणा घडवल्या जात आहेत, या सुधारणा तरुणांच्या संधींसाठी. सरकारचा तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास. या संधींचा उपयोग करून घ्या. स्टार्टअप सुरू करा, स्थानिक समस्या, देशाच्या समस्या सोडवा. विद्यापीठांत संशोधन झाले पाहिजे. स्वतःच्या करियर प्रमाणे देशाच्या प्रगतीची उद्दिष्टे तरुणांनी ठेवली पाहिजे. तर देशनिर्मितीतील योगदानाला हातभार लागेल, असे मोदी म्हणाले.