औरंगाबाद – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केले आहे. औरगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की “महाराष्ट्रातील भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये राग, असंतोष आहे, आणि फक्त पुलवामा हल्ल्या सारखीच घटना राज्यातील लोकांचा मूड बदलू शकते”. या विधानामुळे पवार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
यावेळी पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकांआधी लोकांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात असंतोषाच वातावरण होत. मात्र, सीआरपीएफ जवानांवर पुलवामा हल्ला झाल्यानंतर पूर्ण परिस्थितीच बदलली. आता लोकांच मन फक्त पुलवामा सारख्या परिस्थितीनेच बदलू शकेल. फेब्रुवारीमध्ये हा पुलवामा हल्ला झाल्यानंतर जेव्हा मी या प्रकरणाची चौकशी केली त्यावेळी हे सगळ जाणूनबुजून करण्यात आले आहे, असा संशय मला आला, असा दावा त्यांनी केला आहे.
मी यापूर्वी संरक्षण विभागात काम केले आहे, जेव्हा मी काही अधिकाऱ्यांसोबत या पुलवामा हल्ल्यासंदर्भात बोललो, तेव्हाच मला संशय आला की हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आलाय. यामागे पाकिस्तानचा ही हात असू शकतो. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने बालाकोटवर एअर स्ट्राईक केला होता.
ते असेही म्हणाल की बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारची लोकप्रियता वाढली. परंतु, महाराष्ट्रात मोदींची हवा काम करणार नाही, कारण फडणवीस सरकारच्या कामावर लोकांचे मन समाधानी नाही. या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच नुकसान होणाार. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. फडणवीस सरकारने अस कोणतच चांगले काम केले नाही की त्यामुळे त्यांची पुन्हा सत्ता येईल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या संदर्भात ते म्हणाले की आम्ही काॅंग्रेस., रासप, समाजवादी पक्ष, आणि इतर छोट्या पक्षांना आमच्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे पवार यावेळी म्हणाले.