शरद पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी
पुणे – नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा कांदा 15 ते 20 रुपये प्रती किलो दराप्रमाणे खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी केला, तर तो संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्यामार्फत खरेदी करण्यात यावा. कांदा उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा कांदा 15 ते 20 रुपये प्रती किलो दराप्रमाणे खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.
शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी केला, तर तो संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्यामार्फत खरेदी करण्यात यावा. याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करावा, अशी मागणी मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. परंतु, बाजारबंद असल्याने कांदा पडून आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला देशांतर्गत गरजेपेक्षा काही लाख टन कांदा विक्रीविना पडून आहे. तसेच, रब्बी हंगामात उत्पादन होत असलेला कांदा मिळून मोठ्या प्रमाणात माल शिल्लक राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर परिस्थिती सुधारली, तरी कांद्याला किफायतीशीर बाजारभाव मिळणे अवघड आहे. सध्या, बाजारात कांद्याचे भाव सहा ते आठ रुपये किलोपर्यंत घसरलेले आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे अनेक बाजार समिती प्रशासनाने कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोरोनाच्या भितीमुळे तसेच कांद्याला मागणी नसल्यामुळे व्यवहार करण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविलेली आहे.