मुंबई – शहरांच्या नामांतरांचे राजकारण अनेक वर्षांपासून होत आहे राजकीय नेते शहरांची नाव बदलण्याची मागणी अनेकदा करत असतात. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे, “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
या नामांतराच्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. आनंद दवेंनी मिटकरी यांच्या नामांतराच्या मागणीला विरोध करत, पुण्याच्या नामांतराची गरज नसल्याचे म्हटले आहे. आनंद दवे पुढे म्हणाले, ‘पुण्याचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही.’असेही ते म्हणाले.