राजेंद्र वाघमारे
नेवासा – राज्यात आणि देशात सध्या सर्वञ जम्मू – काश्मीरातील कलम ३७० मोदी सरकारने हटविल्यामुळे आणि राम मंदिराचा भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याचा बेत नववर्षात आखल्यामुळे ‘हर घर में एक ही नाम, एक ही नारा गुंजेगा… मेरे भारत का बच्चा बच्चा जय..जय श्रीराम बोलेगा’ची धुन चौहिकडेच सर्वञ मोठ्या धुमधडाक्यात व जल्लोषपुर्ण वातावरणात प्रचंड प्रमाणात सर्वञच वाजविली जात असून आयोध्या येथील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे हिंदू मतपेटी अधिक सुरक्षित होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुढचे सरकार मोदी सरकारच असल्याची जनभावना सर्वञ निर्माण झाल्याचे आता भाजपा कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
देशाचे गृहमंञी अमित शहा यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली असून मोदी सरकारचा पुढचा अजेंडा काय असणार?याबाबत पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे नुकत्याच एका रॅलीला संबोधित करतांना शहा यांनी एक मोठे विधान करत आम्ही सीएए लागू करु हा देशाचा कायदा आहे ? आम्हाला कोणी रोखू शकत नाही?असे ठणकावून स्पष्ट करत केंद्रिय गृहमंञी शहा यांनी आपला इरादा स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला आहे त्यामुळे या मोदी सरकारवर जनता धडाकेबाज निर्णय घेत असल्यामुळे चांगलीच फिदा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून वादे आणि इरादे यांची मोदी सरकारकडून पुर्तता होत असल्यामुळे अनेकांची मने जिंकली गेल्याचे उघड होत आता ‘हर घर में एक ही नाम, एक ही नारा गुंजेगा… मेरे भारत का बच्चा बच्चा जय..जय श्रीराम बोलेगा’ची धुन मोठ्या डौलात गल्ली बोळात वाजतांना सध्या चांगलीच दिसून येत आहे.
देशातील राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे स्वप्न अखेर साकार झालेले आहे.अयोध्येत श्रीरामाचे भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे. २२ जानेवारीला या मंदिरात श्रीरामाचे बाल रूप रामलालाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारीही सुरू झालेली आहे अतिशय भव्य-दिव्य असे हे राम मंदिर भाविकांसाठी २२ जानेवारी पासून खुले होणार असल्यामुळे हिंदूधर्मियांत नवचैतन्य पसरले असून कलम ३७० आणि राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे भाजपाची हवा सर्वञ निर्माण होत असल्याचेही आता भाजपाच्या कार्यकर्त्यांतून सांगितले जात असल्यामुळे विरोधकांनाही या मुद्द्याचा चांगलाच धसका घेतल्याचे बोलले जात आहे.