लखनऊ : सरकार दरबारी असलेल्या कागदपत्रांच्या रेकॉर्डमध्ये मृत म्हणून नोंद झालेले अनेक लोक प्रत्यक्षात जिवंत आहेत अशा लोकांना त्यांचा हा जिवंतपणा बहाल करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने चळवळ सुरू केली आहे लाल बिहारी मृतक असे या इसमाचे नाव आहे त्याचीही नोंद सरकार दरबारी मृत अशी झाली होती.
1975 ते 1994 या कालावधीमध्ये सरकार दरबारी त्याच्या नावासमोर मयत अशीच नोंद करण्यात आली होती पण तो प्रत्यक्षात जिवंत असल्याने त्यांनी 19 वर्षे संघर्ष करून आपल्या नावासमोरील मयत हा शब्द काढून घेतला ही घटना लक्षात ठेवण्यासाठी त्याने आपल्या नावासमोर मृतक हा शब्द वापरण्यास सुरुवात केली, त्यामुळे तो लाल बिहारी मृतक या नावाने ओळखला जातो उत्तर प्रदेशांमध्ये अशा प्रकारे अनेक घटना घडत असल्याने सरकार दरबारी मृत असलेल्या पण प्रत्यक्षात जिवंत असलेल्या अनेक लोकांना त्यांची ओळख निर्माण करून देण्यासाठी आता त्याने चळवळ सुरू केली आहे.
आपल्या या चळवळीमुळे अनेक सरकारी कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने आपल्या जीवाला धोका असून मला एके फोर्टी सेवन रायफल वापरण्याची परवानगी मिळावी असा अर्ज त्याने सरकारकडे केला आहे लाल बिहारी ने 1975 मध्ये एका बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला असताना बँकेचे अधिकाऱ्यांनी तो सरकारी रेकॉर्ड प्रमाणे मृत असल्याची माहिती त्याला दिली त्यामुळे दीर्घकाळ त्याला कोणतेही सरकारी काम करता येत नव्हते आपण जिवंत आहेत.
हे सिद्ध करण्यासाठी त्याने 1994 मध्ये स्थानिक निवडणूकही लढवली होती. अखेर त्याच्या या दीर्घ संघर्षाला यश येऊन त्याला त्याचा जिवंतपणा बहाल करण्यात आला. दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी त्याच्या या संघर्षावर आधारित कागज हा चित्रपट तयार केला होता. आपल्या 19 वर्षाच्या संघर्षाची नुकसान भरपाई मिळावी असा अर्ज लाल बिहारीने न्यायालयात केला होता आणि तब्बल 25 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला होता पण आता अशाच प्रकारे सरकार दरबारी मृत घोषित झालेल्या लोकांना सहाय्य करण्यासाठी त्याने चळवळ सुरू केली आहे.