मुंबई (प्रतिनिधी) – करोनाच्या संकटामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. करोनाची व्याप्ती वाढतच चालली असून यावर नियंत्रण यायला अजून किमान महिना-दीड महिना लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे परीक्षा केव्हा होणार? पुढील शैक्षणिक वर्षे कधी सुरू होणार? सामाईक प्रवेश परीक्षेचे काय? याबाबत संभ्रम असून विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठांनी विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का, यासाठीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या आहेत.