मुंबई: शरद पवारांच्या राजकारणाचे पर्व आता संपले असून आताची पिढी बदलेली आहे, त्यांना तोडाय फोडायचं राजकारण नको असल्यानेच ते भाजप बरोबर आहेत. तसेच नव्या पिढीला अभिप्रेत असलेलीच भूमिका भाजप कडून घेतली जात असल्याने लोक आमच्या बरॊबर आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत.
तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता असा आरोप शरद पवार करतात. त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. शरद पवारांनी राजकारण करताना पक्ष बनवले, फोडले आता तेच त्यांच्यासोबत होत आहे तर ओरड कशाला करता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.