मुंबई – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणखीनच वाढली आहे. राज्यातही याचे पडसाद दिसून येत असून इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
ग्रुप-23चे सदस्य असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच कॉंग्रेस अध्यक्षपदावरून आवाज उठवला होता. याच वक्तव्यावरून चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष तारिक अन्वर यांनी पाठवलेल्या मेलमध्ये वीरेंद्र वशिष्ठ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
वशिष्ठ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या गेल्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनेल्सवर सुरू असलेल्या खोट्या वक्तव्याकडे मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. राहुल गांधी यांच्याविरोधात खोटे बोलल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याचीही माझी मागणी आहे.
विशेष म्हणजे चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती. चव्हाण यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आणि आनंद शर्मा यांच्यासह जी-23 सदस्य होते.