नागपूर – 2014च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी, असे एका गटाचे म्हणणे होते. हा गट राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती करण्याच्या बाजूचा होता, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. तसे राष्ट्रवादीसोबत युती न करणे, ही चूक झाली, असे मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2014मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता.
त्यामुळे आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवले. तसेच तो आमचा मित्र पक्ष आहे आणि त्यावेळी दोन्ही पक्षांची विचारधारा ही समान होती. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावे असं आमचं मत नव्हतं.
त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे. राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली, असे मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. यूपीमध्ये अनधिकृत भोंगे काढायला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात भोंगे काढले जात नाहीत. परंतु नियमानुसार जे करायला पाहिजे, ते करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.